मुलुंड (MULUND) येथे मेट्रोच्या(METRO) कामादरम्यान पिलरचा भाग कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट(SOCIAL MEDIA POST) करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
अमित ठाकरे(AMIT THACKERAY)यांनी आपल्या पोस्टमध्ये(POST)म्हटले आहे की, मुंबईतील नागरिकांची सुरक्षा ही सरकारसाठी प्राधान्याची बाब राहिलेली नाही. “विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मुंबईकरांची (MUMBAI) किंमत शून्य झाली आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे . दरम्यान, यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे(ADITYA THAKERAY) यांनीही या घटनेवरून सरकारला धारेवर धरले होते. मुलुंडमधील (MULUND)या दुर्घटनेनंतर मेट्रो प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
