Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : ज्याला विराट कोहलीला 6 वर्ष लागली ‘तो’ महाविक्रम यशस्वीने 7 महिन्यात केला

916 0

मुंबई : धर्मशाला कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 1 धाव बनवताच विराट कोहलीचा 7 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने 2016-17 मधल्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी हा विक्रम रचला. तर यशस्वी जयस्वालने पदार्पणाच्या अवघ्या ७ महिन्यातच कोहलीचा विक्रम मोडला.

धर्मशाला कसोटीत यशस्वी जयस्वालने पहिल्या 3 चेंडूत 1 धाव करत कोहलीचा विक्रम मोडला. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 655 धावा करणारा विराट कोहली हा भारताचा एकमेव फलंदाज होता. आता हा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर झाला आहे. यशस्वी जयस्वालने मालिकेतील पाच कसोटी सामन्यात तब्बल 712 धावा केल्या आहेत. यात 2 शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 214 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण मालिकेत यशस्वीच्या आसपासही कोणी नाही.

या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जॅक क्राऊली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 407 धावा केल्या. तर टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिलने 351 धावा केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. यशस्वी जयस्वालने अवघ्या 8 कसोटी सामन्यात 971 धावा केल्या आहेत. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Shivsena MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; शिवसेना, नार्वेकरांबद्दल दिला ‘हा’ आदेश

Mumbai Indians : ‘या’ कारणांमुळे ‘मुंबई इंडियन्स’ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय घेतला

Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; कष्टाळू कार्यकर्ता कोण?

Nashik News : वाटलं खेळता खेळता बुडाला पण…; नाशिकमधील ‘त्या’ 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा Video आला समोर

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide