नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात (IND VS ENG) पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. या सिरीजचा चौथा सामना रांची येथे खेळवला जात असून या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा गोलंदाज आर अश्विन याने इंग्लंडच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह त्याने माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा एक विक्रम देखील मोडीत काढला आहे.
रांची येथील जेएससीए स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडला 145 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. त्यामुळे भारताला चौथ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी 192 धावांचे आव्हान मिळाले. या दरम्यान बॉलिंगमध्ये आर अश्विन आणि कुलदीप यादवने जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना आर अश्विनने 5 तर कुलदीप यादवने तब्बल 4 विकेट्स घेतल्या आणि जडेजाला एक विकेट मिळवण्यात यश आले.
आर अश्विनने हा विक्रम मोडला?
आर अश्विनने आतापर्यंत तब्बल 35 वेळा टेस्ट क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. यासह अश्विनने भारताचे माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड देखील मोडला.अश्विन भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड अनिल कुंबळे यांच्या नावे होता त्यांनी भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने इंग्लंडचा फलंदाज ओली पोपची घेतलेली विकेट त्याची 351 वी विकेट ठरली. भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हरभजनसिंह 265 विकेट्स सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vitamin ‘P’ : तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन ‘P’ का महत्वाचे असते?
Manoj Jarange : फडणवीसांचा सलाईनमधून विष देण्याचा डाव; जरांगेंचा खळबळजनक आरोप
Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद
Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन
WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास
Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा