जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध कीर्तनकार, शिव व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. देहू नगरीतून ही अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता आणि आता फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा विवाह होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. शिरीष महाराज मोरे यांनी टोकाच पाऊल का उचललं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय आढळून आलंय. पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट.
शिरीष महाराज मोरे यांचं धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठा योगदान होतं. वारकरी संप्रदायातील एक तरुण उमदे नेतृत्व, शिवव्याख्याते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणून शिरीष महाराज मोरे महाराष्ट्राला परिचित होते. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांनी हे टोकाच पाऊल का उचललं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येच टोकाच पाऊल उचलल असल्याची माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज यांनी खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्येच कारण हे आर्थिक विवंचनेतून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.