महावितरणने विश्वासार्हतेचे निर्देशांक नियमितपणे प्रसिध्द करावेत, सजग नागरिक मंचाची मागणी

57 0

पुणे- दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना गेल्या चार महिन्यांपासून महावितरणने विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्दच केलेले नाहीत. त्यामुळे नियमाप्रमाणे दरमहा हे निर्देशांक प्रसिध्द करावेत अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाला पाठवलेल्या पत्रात वेलणकर यांनी म्हटले आहे की, वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द करणे आवश्यक आहे. यातून ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे समजते. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर सप्टेंबर २०२१ नंतर हे निर्देशांक गेल्या चार महिन्यांपासून प्रसिद्ध केलेले नाहीत.

महावितरणकडे त्यासाठी वारंवार तक्रार करावी लागणे दुर्दैवी असून तक्रार केल्यानंतर काही तासांत तीन तीन महिन्यांची माहिती प्रसिद्ध केली जाते. याचाच अर्थ महावितरणच्या कारभाराचे चित्र स्पष्ट होत असल्यामुळे माहिती प्रसिध्द करण्याचे टाळले जाते. त्यामुळे हे निर्देशांक नियमितपणे दरमहा प्रसिद्ध केले जावेत तसेच महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा होण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.

Share This News

Related Post

#PUNE ACCIDENT : कात्रज बोगद्याजवळ विचित्र अपघात; वाहनांची अक्षरशः उलथापालत !

Posted by - March 6, 2023 0
पुणे : कात्रज बोगद्याजवळ आज सकाळी विचित्र अपघाताची घटना घडली आहे. दरी पूल पेट्रोल पंपाजवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने…
Swapnil Joshi

Ajit Pawar : राजकीय भूकंपानंतर स्वप्नील जोशीचे ‘ते’ ट्वीट मोठ्या प्रमाणात चर्चेत

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी…

‘आठवा रंग प्रेमाचा’ चित्रपटात रिंकूचा वेगळा लूक, १७ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ट्रेलर

Posted by - June 11, 2022 0
काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा’ या…

‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी आपल्या चुकीमधून काय दिला संदेश ? पाहा (व्हिडिओ)

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मग तो व्यायाम असला तरीही. आपल्या आवाक्यापेक्षा अति व्यायाम करणे बऱ्याचदा हानिकारक ठरते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *