KUNDMELA BRIDGE COLAPSE: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला असून
या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण
अद्यापही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (KUNDMELA BRIDGE COLAPSE)
TOP NEWS MARATHI:इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
हा पूल पर्यटकांमध्ये ‘कुंडमळा पूल’ म्हणून प्रसिद्ध होता.
कुंडमळा पूल… इंद्रायणीच्या शांत पात्रावर उभा असलेला एक जुना पूल आहे.
आज अचानक कोसळला हा पूल कोसळला …या पुलावर पर्यटकांची गर्दी होती…
क्षणातच पायाखालची जमीन सरकली आणि अनेक जण पाण्यात कोसळले.
या पुलाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून खराब होती.
स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं.
याचा परिणाम म्हणजे आजची ही दुर्घटना
या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
PUNE KUNDMALA BRIDGE: कुंडमळा पूल दुर्घटना: 38 जणांना वाचविण्यात यश
तर 20 ते 25 जण अद्यापही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे
पाण्यात वाहून गेलेल्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन,
पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने दाखल झालं आहे.
हा पूल जुना आणि कमकुवत झाल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी केल्याचे सांगितलं जातं आहे
परंतु प्रशासनानं दखल न घेतल्याने हा पूल क्षणात कोसळला.
पुलावर असलेले अनेक पर्यटक थेट नदीत कोसळले. काही जण बाहेर पडले, पण अनेक वाहून गेलेत.
पुलावर रेलिंग नव्हतं, सूचना फलकही नव्हते. या पुलाला कोणतीही देखभाल नव्हती
अशी तक्रार आता स्थानिक करताना दिसून येत आहेत. कुंडमेळा या ठिकाणी मागील काही वर्षांमध्ये अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.
5 सप्टेंबर 2024 रोजी
इंदोरीतील कुंडमळा येथे रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे हा 22 वर्षे तरुण सेल्फी काढत असताना पाय घसरल्याने नदीत पडून त्याचा मृत्यू झाला..
4 मे 2024 रोजी,
शेलारवाडी येथील कुंडमेळा या ठिकाणी दोन युवक
साजीद शरीफ बागवान (२०) आणि आतिक शरीफ बागवान (१५)—पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याचा अंदाज
न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला..
इंदोरी मावळ येथील कुंडमळा येथे
30 जून 2023 रोजी मुसळधार पावसामुळे वाडीवळे
गावाजवळील पूलाजवळचा पर्यायी रस्ता वाहून गेला आणि Maval तालुक्यातील 8 गावांचा संपर्क तुटल्याची घटना घडली होती
16 एप्रिल 2022 रोजी लोखंडी पुला जवळील कुंडदेवी मंदिर परिसरात 18 वर्षीय
अमित मिश्रा हा युवक सेल्फी काढत होता तेव्हा पाय घसरून इंद्रायणी नदीपात्रात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला