FALTAN WARI INCIDENT: विठ्ठल भक्तीचा अद्भुत संगम असलेल्या वारीत दुर्दैवी घटना घडली असून, दोन वारकरी भक्तांनी पंढरपूरच्या पायी वारीदरम्यान फलटण तालुक्यात बरड येथे पालखी मुक्कामी असताना विजेचा शॉक लागून या दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला.
SAI BABA PALKHI 2025 : साई बाबांच्या पुणे ते शिर्डी पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात
आषाढी एकादशीला पंढरपूर वारीची महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. दरवर्षी राज्यभरातून लाखो वारकरी वारीत सहभागी होतात अन् लाडक्या विठुरायाची भेट घेण्यासाठी पंढरीकडे पायी जातात.नागपूरमधील दोन वारकऱ्यांची मात्र विठुरायाची भेट झालीच नाही. त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. माऊलींच्या पालखीत विठुनामाच्या गजरात पंढरपूरकडे (FALTAN WARI INCIDENT) निघालेल्या नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर माऊलांच्या पालखी सोहळ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे असं मृत झालेल्या वारकऱ्यांची नावं आहेत.नागपूरमधील राजाबाक्षा येथील मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे हे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी झाले होते. पण पंढरीत पोहचण्याआधीच विजेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. माऊलींची पालखी फलटणजवळ विसाव्यासाठी थांबली होती, त्यावेळी टेंट उभारताना तुषार बावनकुळे यांचा हात लोखंडी रॉडला लागला.
तुषार यांना लोखंडी रॉडला जोरात करंट लागला, त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या मधुकर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरमधील दोन्ही कुटुंबावर दुखाचा (FALTAN WARI INCIDENT) डोंगर कोसळला. पालखीतही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तुषार आणि मधुकर विठुमाऊलीला भेटण्यासाठी भक्तीत तल्लीन होत निघाले होते, पण त्याआधीच नियतीने घात केला अन् त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ घेऊन निघालेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. विठु-रुक्मिनीचा जयघोष करत अनेकजण पायी पंढरपूरकडे निघाले आहेत. मात्र, साताऱ्यातील फलटण येथे एका वारकऱ्याच्या मृत्यूने शोककळा पसरली. इंदापूर तालुक्यातील न्हावी येथील 75 वर्षीय नामदेव किसन मारकड हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत देहूपासून पायी चालत फलटणला पोहोचले. निंबाळकर वस्तीत विसाव्यासाठी थांबले असता, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.