BACCHU KADU महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असताना महायुती, महाविकास आघाडीबरोबरच परिवर्तन महाशक्ती वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ कंबर कसली आहे.
सर्वच पक्षात आपणच सत्तेत येणार असा दावा करत असतानाच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी शिक्षण राज्यमंत्री आणि अचलपूरचे उमेदवार बच्चू कडू यांनी मोठं विधान करत राज्यात नेमकं कुणाचं सरकार येणार याबाबत क्लियर कट भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार सत्तेमध्ये येईल व मोठ्या पक्षांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल असं बच्चू कडू म्हणाले आहेत.