राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करत असून हल्ले घडवून आणणाऱ्या सरकारशी संवाद कसा साधणार असा म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर निशाणा साधला.
आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नसल्यानं भाजपानं या बैठकीवर बहिष्कार घातला असल्याचं देखील फडणवीस म्हणाले. मुंबई येथील भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
त्याच बरोबर हनुमान चालीसा म्हणणं हा जर गुन्हा असेल तर आम्ही रोज हनुमान चालीसा पठण करू असं देखील फडणवीस म्हणाले.