Thackeray Brothers Morcha 2025 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्रच मोर्चात सहभागी होतील अशी घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अनेक वर्षांनंतर ‘हिंदी’ भाषेच्या निमित्ताने ठाकरे बंधूंचे राजकीय मनोमिलन होणार अशी चर्चा आहे. ठाकरे बंधूंचं एकत्र येणं मात्र आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. या मोर्चाची धग कमी (Thackeray Brothers Morcha 2025 ) करण्यासाठी भाजप कोणती नवीन रणनीती आखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलय…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतर होणार आहेत. असं असताना राज्यातील प्रत्येक राजकीय घडामोड ही प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहे. राज्यात एकीकडे भाजपचं पारडं जड असताना अशाप्रकारे ठाकरे बंधूंचे एकत्र येणं आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.
ठाकरे बंधूंचं ठरलं! हिंदीवरून जुळलं; हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा
भाजपने मराठी हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला असून बीजेपीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये याबाबतची रणनीती (Thackeray Brothers Morcha 2025 ) ठरवण्यात आली आहे असं बोललं जातय. मराठी हिंदी वरून सुरू असलेल्या राजकारणाला आता ‘मराठी अभिजात भाषेचा’ मुद्दा पुढे करून शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला ही गोष्ट भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार आहे. याचे महत्त्व भाजप लोकांमध्ये जाऊन सांगणार आहेत अशी चर्चा आहे.
याबाबत बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं की, पहिल्यापासून तिसरी भाषा ही तोंडी आहे. त्यात लेखीचा समावेश नाही हिंदी ही सक्तीची आहे असं म्हणून गैरसमज पसरवला जातोय हे समजायला मराठी माणूस काही दुधखुळा नाही. याचे जो राजकारण करत असेल त्याला राजकीय उत्तर द्यायला भाजप सक्षम आहे. अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे
तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आपली गमावलेली राजकीय स्पेस राजकीय पद पुन्हा मिळवण्यासाठी केलेली ही धडपड आहे. यांना मराठी भाषेबद्दल काहीच देणंघेणं नाही. जिथे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेची सक्ती आहे. हिंदी भाषेची सक्तीच नाही मग असं असताना साप साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिंदेंची शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत
दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की दोन मोर्चा आहेत त्याची व्याख्या मी अशी करतो की एकाने हिंदी स्वीकारली, हिंदी सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला. त्यांचा एक मोर्चा आहे आणि एक मोर्चा राज साहेबांचा आहे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. हे त्यांच्या मोर्चात जातात आणि ते यांच्या मोर्चात जातात आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं आणि त्यांच्या 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चा नं खरंच मराठी मनं जिंकता येतील का? भाजप साठी हा मोर्चा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने धक्का ठरेल? की या मोर्चासाठी भाजपची रणनीती भारी पडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ताज्या मराठी बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी.