‘तटकरे की गोगावले’ रायगडचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार?

1846 0

रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू आहे. रायगडचं पालकमंत्री पद अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले नाराज झाले. या नाराजीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आता रायगडचा पेच सुटणार की कायम राहणार. शिवसेना आणि राष्ट्रवादीत कसा संघर्ष सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून पेटलेल्या संघर्षाला आता अधिक धार लागली आहे. तटकरे कुटुंबाला पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेने घेतलाय. तर रस्त्यावर टायर पेटवणे ही आपली संस्कृती नाही. मुख्यमंत्री आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असा निर्वाळा खासदार सुनील तटकरे यांनी दिलाय. खरंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून आधीही मोठा संघर्ष होता आणि आता पुन्हा तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता याबाबतची नेमकी वस्तूस्थिती काय हे विचारात घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचा पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली. योग्य निर्णय निश्चित होऊन रायगडच पालकमंत्री पद हे आपल्यालाच मिळेल असा विश्वास शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय. महायुती सरकारन 18 जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच अपेक्षित मंत्र्यांना डावण्यात आल्याने महायुतीत मोठ्या प्रमाणात धुसफुस सुरू झाली. सर्वाधिक तीव्र नाराजी ही रायगड वरूनच दिसून आली. भरत गोगावले हे अगदी सुरुवातीपासूनच रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. आणि हे पद आपल्यालाच मिळेल अशी त्यांना अपेक्षाही होती. मात्र प्रत्यक्षात वेगळच घडलं. आणि गोगावले समर्थक नाराज झाले.

आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळताच गोगावले समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. रस्त्यावर टायर जळून तटकरे यांचा निषेध व्यक्त केला. वातावरण तप्त झालेल पाहताच रात्रीतून आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. आता राष्ट्रवादीकडून पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे याच कशा योग्य आहेत हे दाखवून दिल जात आहे.एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर होत असल्यासही दिसून येतय.. दरम्यान आपल्या नेत्यांना डावलल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते थेट आपल्या दरेगावी गेले. एकीकडे रायगडच पालकमंत्री पद हे आम्हालाच मिळावं यावर राष्ट्रवादी जोर धरून आहे तर अशीच परिस्थिती शिवसेनेतही आहे. शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आमचा राजकीय अस्त झाला तरी आम्ही तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही अशी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या उठावात रायगडकरांचं फार मोठं योगदान आहे. भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि मी उठावाला पाठिंबा दिला. अन्यायाला वाचा फोडण्याच काम आम्ही शिंदेंच्या नेतृत्वात केलं. भरत गोगावले यांना आधीही मंत्री पदासाठी त्याग करावा लागला आहे. ते जर तेव्हाच मंत्री झाले असते तर रायगडचे पालकमंत्री ही झाले असते.

Share This News
error: Content is protected !!