अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे
याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांची नाराजी आणि आमची सुप्रीम कोर्टातील केस याचा काहीही संबंध नाही. त्यांचा मुलगा पार्थ पवार यांचा झालेला पराभव तेव्हा पासून ते नाराज आहेत. नाराजीच्या खेळामध्ये त्यांचा मोहरा बनवला जात आहे. असे संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी शिरसाट यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, नागपूर येथे आयोजित वज्रमुठ सभेत अजित पवार यांना बोलू दिलं नाही. १० मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही. तसेच धनंजय मुंडे यांनी मला सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते. तेव्हापासूनच अजित पवार यांची नाराजी आहे, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.
दरम्यान १५ आमदार असणाऱ्या पक्षाचा प्रमुख वज्रमुठ सभेत मुख्य भाषण करतो. पण अजित पवार यांना बालू दिलं गेलं नाही. हे देखील नाराजीचं कारण असू शकतं. अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होऊन आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर आमची विचारसरणी मान्य करावी लागले. मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही शिरसाट यांनी नमूद केलं.