मुंबई: लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र शरद पवारच अध्यक्षपदी राहावेत अशी कार्यकर्त्यांसह प्रमुख नेत्यांची इच्छा असून या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शरद पवारांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते असं म्हटलं आहे
मात्र, जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असताच….आता आपण ६ मे रोजीची बैठक ५ मे रोजीच घ्या. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता ते राजीनामा मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल