नागपूर : सध्या नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी बीडमध्ये झालेल्या हिंसाचारावरून आक्रमक भूमिका घेतली. बीड जिल्ह्यात झालेला प्रकार गंभीर होता, माझ्या घराकडे मॉब येत होता. एक पोलीस गाडी होती, ती पण निघून गेली. हे घडत असताना पोलीस निघून गेले असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केला.
नेमके काय म्हणाले संदीप क्षीरसागर ?
बीड जिल्ह्यात झालेला प्रकार गंभीर होता. माझ्या घराकडे मॉब येत होता. एक पोलिसांची गाडी होती ती पण बाजूला गेली. हे घडत असताना पोलीस निघून गेले. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. माझं घर जळत होतं, माझं कुटुंब आत होत. माझा मुलगा मला फोन करत होता. बाबा लवकर घरी या. घरात बॉम्ब पडत आहे. हे सर्व वेल प्लॅन्ट होतं. आंदोलक एकमेंकाना इशारे करत होते. या मागचा मास्टरमाइंड कोण आहे ते समोर आलं पाहिजे असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत.
संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
ही घटना गंभीर आहे. लोकप्रतिनिधींची घर जाळणं योग्य नाही, सर्व पक्षीय लोकांच्या घरावर आणि ऑफिसवर हल्ला झाला. अशा घटना राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायला हव्यात. जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस उपलब्ध होते, त्यांनी नियंत्रण केलं. पण जमाव अधिक होता त्यामुळे पोलीस कमी पडले असे उत्तर यावेळी फडणवीसांनी दिले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड
Pune Crime News : खळबळजनक ! केस पडल्याच्या रागातून जावयाकडून सासूवर प्राणघातक हल्ला
Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप
Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती
Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल