RAJ THACKERAY: मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरंवटा फिरवणारा विकास नको- राज ठाकरे

RAJ THACKERAY: मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरंवटा फिरवणारा विकास नको- राज ठाकरे

547 0

मुंबई: मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नको, अशा कठोर शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. फ्लायओव्हर दिसायला छान आहेत, पण त्यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला असा विकास अजिबात नको असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024′ नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य केली जाणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. मात्र, या निर्णयाला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह मनसेने कडाडून विरोध सुरू केला आहे.

निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांचा पॉडकास्ट बनवला आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीविरोधात आपली प्रखर भूमिका मांडली आहे. महेश मांजरेकर यांनी त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नुसता भाषा दिवस साजरा करून अथवा अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी टिकणार नाही. शासनकर्ते, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणे खूप आवश्यक आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नकोच, अशी परखड भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. देशात आयएएस अधिकारी घडविणाऱ्या शाळा सुरू झाल्यात, पण या शाळांमधून क्रांतीचा उगम असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही. आपल्या मुलांना फ्रेंच रिव्हॉल्युशन शिकवून काय करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात ‘हिंदीकरण’ करण्याचा सरकारचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा गर्भित इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!