Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

520 0

चंद्रपूर : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. आगामी लोकसभेमध्ये 30 टक्के मत हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मतानुसार मतदान होईल, असा अंदाजदेखील आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. आज चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

मविआने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या – प्रकाश आंबेडकर
कल्याणची जागा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठीची जागा राष्ट्रवादी पक्षाने पाच वेळा निवडणुकीत पराभव झालेला व्यक्तीस उमेदवारी देऊन ती जागा त्यांच्या साठी सोडलीय. अशा अनेक जागा आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो, याचा विचार केला पाहिजे. नवीन कार्यकर्ता, मतदारसंघात नवा उमेदवाराचा चेहरा असताना त्याला डावलून नेहमीच पराभूत झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी देत आहात, म्हणजे याचा नेमका अर्थ काय, हे लक्षात घेतले पाहजे. अशा वीस मतदारसंघातील नावे मला सांगता येतील, जिथे उमेदवारांची फिक्सिंग झालीय. असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jayant Patil : ‘आता जनताच ठरवेल कोण असली कोण नकली?’ जयंत पाटलांचं अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Loksabha : शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला वंचित कडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Share This News
error: Content is protected !!