सातारा : आज 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.सध्याच्या निकालानुसार (Assembly Election 2023) भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आघाडी घेतली आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. जवळजवळ आकडेवारीनुसार ध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपचे कमळ फुलले आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेसने आपली सत्ता मिळवण्यात यश मिळवले आहे. काँग्रेसच्या या पराभवावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
भाजपचा कल दिसतोय ही गोष्ट मान्य केली पाहिजे. यासाठी दोन तीन कारणं आहेत. दोन ठिकाणी भाजपचं राज्य होतं तिथे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं. राजस्थानमध्ये काँग्रेस पाच वर्ष सत्तेत होती. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी हा राजस्थानचा कल आहे. राहुल गांधींची हैदराबादला सभा झाली. या सभेला असलेली उपस्थिती पाहिल्यानंतर तेलंगणामध्ये सत्ता परिवर्तन होणार याची आम्हाला खात्री होती. या सर्व निकालावर साडेपाचनंतर भाष्य केलं तर बरं होईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात
Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?
Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला