मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘ज्या ज्या वेळी हा विषय आमच्यासमोर आला तेव्हा सभागृहाने हा ठराव एकमताने मंजूर केला. ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मंजूर झालं, कायद्याच्या सर्व निकषांवर, सर्व पातळींवर हे आरक्षण टिकेल याची मला आशा वाटते. सभागृहाला काही समजून सांगण्याची गरज नव्हतीच कारण सभागृहाने दोन्ही वेळी एकमताने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मराठा समाजालाही धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी खूप लढा दिला आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल आता तरी शंका घेत नाही. निर्घृणपणे निर्दयीपणे आंदोलकांची डोकी फोडली गेली, ती फोडण्याची गरज नव्हती. हा विषय शांततेनं सोडवता आला असता. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, अशी आशा आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL 2024 : अखेर ठरलं ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा 17 वा सिझन
Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा
HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम