Jayant Patil And Sharad Pawar

Maharashtra Politics : 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

594 0

मुंबई : येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे (Maharashtra Politics) निकाल जाहीर होणार आहेत. या अगोदर अनेक नेत्यांनी दावे – प्रतिदावे करायला सुरुवात केली आहे. असाच एक मोठा दावा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांनी केला आहे. शरद पवार गटाचे जयंत पाटील 4 जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटलांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितल्याचा खळबळजनक दावा सूरज चव्हाणांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके काय म्हणाले सुरज चव्हाण?
लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. तर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच सूरज चव्हाण यांच्या दावामुळे एकच खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांची साथ होणार आहे, असा दावा केलाय. सूरज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसुद्धा काँग्रेसमध्ये जातील. जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली असून त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे 4 जूननंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा रिकामा होणार आहे. तिकडचे अनके लोक अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली पक्षप्रवेश करतील असंही सुरज चव्हाण म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ! ‘हा’ निष्ठावंत शिलेदार सोडणार साथ

PUNE ACCIDENT BREAKING NEWS: ब्रह्मा रियालिटी चे संचालक विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील अनधिकृत रिसॉर्ट सील

PUNE PORSCHE CAR ACCIDENT: अल्पवयीन कारचालक आरोपी वेदांत विशाल अग्रवालची आई शिवानी अग्रवालला अखेर अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!