Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘जर जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर रावसाहेब दानवे..’ भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

403 0

सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला (Maharashtra Politics) आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. मात्र आता दुसरीकडे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील ऑफर मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, त्यांना आपण पाठिंबा देऊ असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, आपण त्यांच्या पाठिशी उभे राहू असं म्हटलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले भागवत कराड ?
जालना लोकसभा मतदारसंघातून जरी मनोज जरांगे पाटील हे उभे राहिले तरी भाजपचे नेते रावसाहेब दानवेच पुन्हा निवडून येतील, असं कराड यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. मतदार संघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवार असले तरीही रावसाहेब दानवे यांचा विजय पक्का आहे. रावसाहेब दानवे हे जरांगेंना घाबरणार नाहीत असेदेखील कराड म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!