मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अजित पवार, सुशील कुमार शिंदे, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. तर आतापर्यंत किती टक्के मतदान पार पडले चला जाणून घेऊया…
आसाम -10.12%
बिहार – 10.03%
छत्तीसगड : 13.24%
गोवा: 12.70%
गुजरात: 9.87%
कर्नाटक: 9.45%
मध्य प्रदेश: 14.22%
महाराष्ट्र: 6.64%
उत्तर प्रदेश: 12.645
पश्चिम बंगाल: 15.85%
दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव: 10.13%
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.