विधान परिषद निवडणूक: हरणार हरणार म्हणत सदाभाऊ खोत नेमके कसे जिंकले? वाचा संपूर्ण INSIDE STORY

344 0

नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचे निवडणूक पार पडली आणि त्याचे निकालही जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाकडे आमदारांचे पुरेसं पाठबळ नसतानाही त्यांनी पाच उमेदवार दिले. आणि त्यामुळे भाजपाच्या पाचव्या उमेदवार असणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा पराभव होणार असं वाटत असतानाच, सदाभाऊ खोत यांनी आश्चर्यकारकरीत्या विजय संपादन केला. हरणार हरणार म्हणत सदाभाऊ खोत कसे जिंकले पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचं मतदान काल पार पडलं. आणि निकालही जाहीर झाले. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत एकाचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं. आमदारांच्या विजयासाठी 23 कोटा हा निश्चित करण्यात आला होता.भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत असे पाच उमेदवार हे विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवले. भारतीय जनता पक्षाकडे एकूण 103 आमदार आहेत आणि त्यासोबत 8 मित्र मित्रपक्ष आणि अपक्षांची साथ असे एकूण भारतीय जनता पक्षाकडे 111 आमदारांच पाठबळ होतं. आणि भारतीय जनता पक्षाला पाचही आमदार निवडून आणण्यासाठी 115 मतांची गरज होती. त्यामुळे या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा पराभव होणार का अशी चर्चा सुरू झाली. हे सदाभाऊ खोत कसा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकप नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे 11 आमदारासाठी ची लढत ही सदाभाऊ खोत विरुद्ध जयंत पाटील होईल असं वाटत होतं. परंतु सदाभाऊ खोत त्यांना दुसऱ्या पसंतीची मिळून 26 मत पडली सदाभाऊ खोत एक विजय झाले यावरून काँग्रेसचे मत फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारा आमदारांचा पाठिंबा होता तसेच महाविकास आघाडीचे मित्रपक्ष सोबत असताना जयंत पाटील यांच्याकडे सोळा मतं होती यासाठी त्यांना केवळ सात मतांची जुळवाजवळ करावी लागणार होती. परंतु ते शक्य झालं नाही आणि जयंत पाटील यांचा पराभव झाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!