नवाब मलिक (Nawab Malik) हा विषय हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजताना दिसत आहे. नवाब मलिक हे गुरुवारी सत्ताधारी बाकांवर बसले होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. ते महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर महायुती सरकारवर प्रचंड टीका सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नवाब मलिक आपल्यासह नकोत अशा आशयाचे पत्र अजित पवार यांना लिहिले. या पत्राबद्दल अजित पवारांना विचारले असता त्या पत्राचे काय करायचं मी पाहतो असं म्हटलं आहे. आता या सगळ्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची आहे असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यादरम्यान बच्चू कडू यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. नवाब मलिक उद्या म्हणाले की मला अजित पवारांसह जायचं आहे आणि अजित पवार जर म्हणाले की नाही घेत त्यांना तर खरा पिक्चर सुरु होईल. त्या त्या पक्षाची धोरणं सांभाळायचा आहे. नवाब मलिकचा विषय फडणवीस यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. मी त्यांच्या मनातलं कसं काय सांगणार? असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे. आम्ही 150 होतो आता 200 झालो आहोत असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे चुलीत घाला. मला काही घेणंदेणं नाही असंही ते म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…
Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन
Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक
Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या
Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण
Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट
Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं
Mira Road Murder Case : मिरारोड हत्याकांडाचा केमिकल रिपोर्ट आला समोर; मात्र ‘ते’ गूढ अजूनही कायम