Manoj Jarange

5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा…; MANOJ JARANGE PATIL यांचा सरकारला नवा अल्टिमेट

408 0

जालना: राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा (Mahayuti Goverment) शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad maidan) पार पडला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister) तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy Chief Minister) शपथ घेतली.

सरकार स्थापन होताच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा ‘ॲक्शनमोड’वर आले असून त्यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज यांनी सरकारला इशारा देत 5 जानेवारी पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मराठा समाज मोठा आंदोलन करेल असं म्हटलं आहे.

राज्यात नवं सरकार पाच डिसेंबर रोजी स्थापन झालं या नव्या सरकारचं अभिनंदन करतो आणि पाच डिसेंबर पासून ते 5 जानेवारी पर्यंत या एक महिन्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असेही म्हणत तरगे पाटील म्हटले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या या अल्टीमेटमनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवस सरकार नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!