राज्यात नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नागपूर मध्ये पार पडला असून यावेळी 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली आहे. मात्र या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर आता अनेक आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता शिवसेना उपनेते व पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आक्रमक पवित्रा घेत आता अडीच वर्षानंतर मिळालं तरी मंत्रिपद घेणार नाही असं म्हटल आहे.
नेमकं काय म्हणाले विजय शिवतारे?
सुरुवातीपासूनच विजय शिवतारे यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं मात्र अखेरच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झाला याच विषयी नागपूर अधिवेशना दरम्यान विजय शिवतारे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी माझ्यासाठी मंत्रिपद महत्वाचं नाही. माझ्यासाठी काम करणं महत्वाचं आहे, कारण मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. मला दु:ख एवढं आहे की महाराष्ट्र कुठे चालला आहे? तुम्हाला विभागीय नेतृत्व दिली जायची. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि तेथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशा माणसांच्या हातात सत्ता देत आम्ही महाराष्ट्र पुढे नेल. पण आता आपण मागे चाललोय का? आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय का? असं म्हटलं आहे
https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/
MAHARASHTRA CABINET: 33 मंत्र्यांसह 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा संपूर्ण मंत्रिमंडळ
मंत्री व्हा पण केवळ अडीच वर्ष; मंत्रिपदाचा नेमका फॉर्मुला आहे तरी काय?