करूणा शर्मा: 11 नंबर आहेत ते 11 नंबर माझ्याकडे आहेत जर तुम्हाला चौकशीमध्ये मदत हवी असेल तर ते अकरा नंबर मी तुमच्याकडे देऊ शकते .धनंजय मुंडेकडे ११ मोनंबर

करुणा शर्मा :काळे कारणामे लपवण्या साठी धनंजय मुंडेकडे ११ मोबाईल नंबर

506 0

करूणा शर्मा : यांच्याकडून इतक्या दिवसापासून चालू असलेल्या धनंजय मुंडे यांच्या खुलासांबद्दल सगळीकडे चर्चा चालूच आहे .परंतु आता त्यांनी अजून एक खुलासा केला आहे .ज्यामध्ये त्यांनी वाल्मीक कराड यांच्या गुंडागर्दी बद्दल काही खुलासे केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या जोरावर वाल्मीक कराड गुंडागर्दी करत होता .याचा खुलासा करुणा शर्मा यानी केला आहे याबद्दल त्यांनी पुढील विधान.

रणजीत कासले यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला

काल परवा पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये रणजीत कासले यांनी असा खुलासा केला की त्यांना पाच कोटींची ऑफर आली होती एन्काऊंटर करण्यासाठी. मी काल पण सांगितलं होतं मीडियावरती बाईट दिलेली आहे. की १००% पाच कोटी, दहा कोटी, काय पन्नास कोटींची ऑफर पण येऊ शकते कारण मुंडे काय साधारण व्यक्ती नाही. गेले 40 वर्षापासून मुंडे घराणे बीडमध्ये काम करत आहे. एक ख्याती त्यांची होती आणि कोणत्या व्यक्तीच्या मंत्रिपदाच्या जोरावर होती हे सगळ्यांनी बघितलेल आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या जोरावरती ते गुंडागर्दी करत होते. धनंजय मुंडे ची पूर्ण कुंडली वाल्मीक कराडकडे आहे. ती कुंडली बाहेर येऊ नये म्हणून ही ऑफर केलेली असू शकते. आणि आज पीएसआय रणजीत कासले यांनी खुलासा केलेला आहे. आणि कोणाच्या जोरावरती त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. कारण याच्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीचा फायदा आहे ते आहेत धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्याकडे खूप लोकांची कुंडली आहे. त्या कुंडल कुठे ठेवलेले आहेत त्यांनी तर ते वाल्मीक कराड कडे तर ही सगळी राजकारणी लोकांची सत्ताधारी लोकांची खेळी होऊ शकते. त्यांच्यापासून काही लोकांना धोका असू शकतो तर त्यांना दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट केलं पाहिजे अशी मागणी आहे.

राजकारण्यांच्या दबावाखाली शांत बसलेल्या पोलीसांनी आता सर्व खुलासे करावे

रणजीत कासले यांनी खुलासा केला असे खूप कमी ऑफिसर असतात जे खुलासा करतात, काही पळून जातात काही ,दबाव खाली येऊन राजकारण्यांच्या भीतीने शांत बसलेले असतात. असे पोलीस अधिकारी ज्यांच्या वरती अन्याय झालेला आहे जे आज गप्प आहेत भीती पोटी गप्पा आहेत.की हे मंत्री काही करतील या भीतीपोटी गप्पा आहेत. राजकारणी लोकांनी ज्यांच्या ज्यांची नोकरी हिसकावून घेतली आहे. त्या सर्व पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी समोर यावे पीएसआय कासले यांनी जसं खुलासा केला तसं तुम्हीही खुलासी करून त्यांना साथ द्या. जर असंच राजकारण्यांच्या धाकाखाली पोलीसही गप्प राहिले तर महाराष्ट्र मध्ये हे असंच सत्र चालत राहील. पोलीस अधिकाऱ्यांना कधीही न्याय भेटणार नाही आणि असंच हे लोक मंत्री -संत्री ,विधायक आमदार पदावर बसलेल्या आहेत त्या असंच त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून पोलिसांना निलंबित करत राहतील.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा हात आहे का?

मी याच्याबद्दल काही सांगू शकत नाही माझ्याकडे याच्याबद्दल काही पुरावे नाहीयेत. पण याच्यामध्ये एक सांगायचं आहे की जे संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेल आहे. त्यावेळी पीएसआय कासले बीडमध्ये होते तर जे-जे ते सांगतात त्याच्यावरती सखोल चौकशी करून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर आबाधा कंपनीची मीटिंग झालेली. तर तुम्ही सखोल चौकशी करा यामध्ये त्यांचं सीडीआर काढा त्यांच्याकडे 11 नंबर आहेत ते 11 नंबर माझ्याकडे आहेत जर तुम्हाला चौकशीमध्ये मदत हवी असेल तर ते अकरा नंबर मी तुमच्याकडे देऊ शकते . जर याच्यामध्ये धनंजय मुंडे दोष निघाला तर त्याला पण अटक व्हायला पाहिजे. मी कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत आहे देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत माझी भेट घेतली नाही मी त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले होते.

गृहखात्याने पीएसआय कासले यांना न्याय दिला पाहिजे

पीएसआय कासले जे काही खुलासे करत आहेत आणि पुरावे सादर करत आहेत त्याच्यावरती सखोल चौकशी करणे व सत्यता बाहेर आणणे गृहखात्याचे काम आहे. याच्याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे व पीएसआय कसले यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. दरवेळी अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी बळी जात आहेत. पीएसआय अधिकारी काय असेच बनतात का ? या अशा वातावरणामुळे त्यांना राग आलेला आहे म्हणून तर ते हे सर्व खुलासे करत आहेत त्यांच्याकडे अजूनही कित्येक मंत्र्यांचे संत्र्यांची खुलासे असतील ,ते एक पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या गोष्टी वरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. त्यांच्यावरती जो आरोप केला जात आहे की त्यांनी पिऊन व्हिडिओ केलेला आहे. तो मला मान्य नाही माझ्यावरती देखील दोन वेळेस ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला होता त्यांच्यावरती हा ॲट्रॉसिटी गुन्हा कोणी दाखल केला ? याची सगळी सखोल चौकशी करा. आणि “गृहमंत्री जर खरे असतील जर त्यांचा धनंजय मुंडे यांना सपोर्ट नसेल तर पीएसआय कासले यांना बोलवा आणि त्यांना प्रोटेक्शन देऊन सगळ्या केसची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्या.”अशी संधी पुन्हा भेटणार नाही.

पावसाळ्याचे आगमन यंदा ५ दिवस आधीच

एसआयटी नेमल्याने न्याय मिळेल का?

ते स्वतः पोलीस अधिकारी आहेत तर हे खरच असेल की धनंजय मुंडे यांना काही अधिकारी मदत करतात त्याच्यामुळे एसआयटी नेमल्या मुळे न्याय मिळू शकतो असे मलाही वाटते. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये आपण बघितले आहे की पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. तर एसआयटी नेमल्याने न्याय मिळण्याची शक्यता आहे असे मला वाटते.

तुम्ही असं पाहिलं आहे का की धनंजय मुंडे यांनी कुणाला एन्काऊंटर करण्यासाठी सुपारी दिली एवढ्या वर्षांमध्ये

यापूर्वी तुम्ही पाहिला असेल की तीन महिन्या अगोदर एका व्यक्तीने बीड मधील सर्व खुलासे त्या व्हिडिओमध्ये केले होते त्यांनी तो व्हिडिओ पहिल्यांदा मला पाठवला होता तो माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती पण आहे. आणि बीडमधून जे जे लोक पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत जसं की मी! माझ्यावरती दोन केसेस करण्यात आले मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा पुढे येणाऱ्या खूप लोकांचे मर्डर याआधी पण झालेले आहेत. काका गर्जे,संगिंडी घोले, भगीरथ बियानी अशा खूप काही लोकांची नाव पुढे येणे अजून बाकी आहे. पापाचा घडा भरला की फुटतो त्यामुळे या लोकांचे सर्व बाहेर येत आहे. या लोकांची हिम्मत अशीच वाढत चाललेली आहे. तरी अजूनही लोक दुसऱ्यांना धमकी देत आहेत. माझी मम्मी एवढी आहे की गृहमंत्री साहेबांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाची कदर करावी पोलीस अधिकारी मंत्र्यांच्या सेवेमध्ये देशाच्या सेवेमध्ये जीव ओतून काम करत असतात. तर याप्रकरणी कासले यांच्यावरील आरोपाबद्दल चौकशी करून त्यांना निर्दोष साबित करून पुढील त्यांनी सांगत असलेल्या सर्व आरोपी ची सखोल चौकशी करून या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. असा एक गृहमंत्री बना की त्याचे दाखले पुढे दिले जातील.

Share This News
error: Content is protected !!