मुंबई : सध्या राज्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना दिसत आहेत. यामुळे राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात हा वाद रंगताना दिसत आहे. अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे.
या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडून घेण्यात आली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केले आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलत नाहीत, हे स्पष्ट आहे, अशा आशयाचं सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला
Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी