छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. “उलटा निर्णय देणारे आणि ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार” असा खोचक टोला खैरे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
“मुंबई दक्षिण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्षापासून शिवसेना तिथे निवडून येत आहे. पण ते जर म्हणत असतील तिथून लोकसभा लढायची, तर ज्या अध्यक्षांनी उलटा निर्णय दिला आहे. त्यांच्या बाबतीत लोकांचं मत खराब झालेला आहे. पुतळे जाळले, चपला मारल्या, फोटो जाळले यानंतर त्यांना कोण निवडून देईल. आमचे अरविंद सावंत जबरदस्त काम करत आहे. हाडाचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ आहे. त्यांची जबरदस्त तयारी त्या भागात आहे आणि तेच निवडून येतील. राहुल नार्वेकर लढले तरी पडतील. राहुल नार्वेकर यांचे स्वतःचे मत चुकीच्या निर्णयामुळे खराब झाले असल्याचे खैरे म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Manoj Jarange : फडणवीसांचा सलाईनमधून विष देण्याचा डाव; जरांगेंचा खळबळजनक आरोप
Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद
Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन
WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास
Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा