महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडला तर 23 नोव्हेंबरला निघाले जाहीर झाला. एक्झिट पोल नाही वर्तवलेले सर्व दावे या निकालामुळे फेल ठरल्याचं पाहायला मिळालं. कारण महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले. त्यांनी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तब्बल 3 जागांवर विजय मिळवला. तर शिंदेंच्या शिवसेनेने 51 जागा तर अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यांनी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 16 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 जागा मिळाल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बच्चू कडू यासारख्या अनेक दिग्द्स नेत्यांचा पराभव झाला. या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये खोड असल्याचा आरोप केला. नुकतंच कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी विरोधात पुण्यातील महात्मा फुले वाडा या ठिकाणी आत्मक्लेश उपोषण केले. डॉक्टर बाबा आढाव यांची उपोषण स्थळी जाऊन खासदार शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांच्यासह पुण्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भेट घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईव्हीएम विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीतील तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी आंदोलन केले. आंदोलनामध्ये प्रतीकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले विधानसभेमध्ये जो निकाल लागला तो येथील जनतेला मान्य नाही. त्यामुळे आम्ही ईव्हीएम विरोधात आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
