राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून इच्छुक उमेदवार हे पक्षाकडे मोर्चे बांधणी करताना दिसून येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन असे नेते आहेत. ज्याने दोन वेळा एक लाखांहून अधिकच्या मताधिक्याने निवडून आलेत.महाराष्ट्राच्या विधानसभेत आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात 11 वेळा एक लाखांहून अधिकच्या मतफरकाने विधानसभेत विजय मिळविण्यात आला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे नेते गणेश नाईक हे नेते दोन वेळा एक लाखाच्या मताधिक्याने दोन वेळा विजयी झाले.
अजित पवार हे बारामती मतदारसंघातून सातत्याने निवडून येतं आहेत. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी 1 लाख 2 हजार 797 मतांनी विजय मिळविला होता. त्यांना 1 लाख 28 हजार 544 मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष रंजनकुमार तावरे यांना 25 हजार 747 मते मिळाली होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकी अजित पवार 1 लाख 65 हजार 265 मतांनी जिंकले. हा आजवरचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याचा रेकॉर्ड आहे. त्यावेळी अजित पवार यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली त्यात त्यांना 30 हजार 376 मतं मिळाली. विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत किती उमेदवार एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून गेलेले आहेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाखांच्या मताधिक्याने विजयी आमदार
2009 मध्ये काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांनी भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत 1,01, 900 मतांनी विजय मिळवला
2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी बारामती मधून निवडणूक लढवली. त्यात त्यांनी 1,02,707 मतांनी विजय मिळवला. 2019 मध्येही त्यांनी 1,65,265 मतांनी विजय मिळवला
2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील ज्यांनी माळशिरसमधून निवडणूक लढवत 1,04,412 मतांनी विजय मिळवला
2009 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत 1,05,778 मतांनी विजय मिळवला
2009 मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी 1,07,503 मतांनी विजय मिळवला
1995 मध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवत 1,09,001 मतांनी तर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत
1,18,276 मतांनी विजय मिळवला
2019 मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांनी 1,21,482 मतांनी विजय मिळवला
2019 मध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे किसन कथोरे यांनी 1,36,040 मतांनी विजय मिळवला
2019 च्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी 1,62,521 मतांनी विजय मिळवला