Manoj Jarange Patil

कोणत्या जागा लढवणार अन् कोणत्या पाडणार ? जरांगे पाटलांचा निर्णय झाला

146 0

विधानसभा निवडणूकांचं बिगुल वाजल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही लक्ष लागलेलं आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे. जरांगे पाटील हे विधानसभेत उमेदवार देणार असल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. मात्र नेमक्या कोणत्या जागा ते लढवणार आहेत याबाबत स्पष्टता नव्हती. याचाच निर्णय आज जरांगे पाटील जाहीर करणार आहेत. आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील सर्व माहिती देणार आहेत.

‘या’ जागा लढवणार

बीड, जालना, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपले उमेदवार देणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. तर केज मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. याबरोबरच गेवराई आणि आष्टी विधानसभेबाबतही चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

काही ठिकाणी निवडणूक लढवणार असून ज्या उमेदवारांनी जरांगे यांच्या मागण्यांना पूर्वी विरोध केला होता किंवा विरुद्ध विचारसरणी असलेल्या काही उमेदवारांना पाडणार असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. याबाबत आज अंतरवाली सराटीमध्ये सर्व मतदारसंघातील इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणते मतदार संघ लढवायचे हे ठरलं असून कोणते पाडायचे हे देखील ठरलेलं आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित मतांची जुळवा जुळव करून उमेदवार निवडून आणण्यासाठी समीकरण तयार होईल अशा ठिकाणी उमेदवार दिले जाणार आहेत. ज्या ठिकाणी मतांचा समीकरण बसणार नाही त्या ठिकाणी इतर पक्षातील उमेदवार पाडण्यासाठी ताकद लावली जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती मनोज जरांगे पाटील आजच्या पत्रकार परिषदेत देणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!