मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. जरांगे पाटील हे काही ठिकाणी उमेदवार देणार असून काही ठिकाणचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याबाबतचे सविस्तर माहिती ते पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत. मात्र त्याआधी जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर कोणते नेते आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टरचा फटका काही नेत्यांना बसणार आहे.
कुठे उभे करणार ?
1) केज, (राखीव, बीड जिल्हा)
2) पाथरी, (परभणी जिल्हा)
3) बीड, (बीड जिल्हा)
4) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
5) परतूर, (जालना जिल्हा)
6) हदगाव, (नांदेड, जिल्हा)
7) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
कुठे पडणार ?
1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
3) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
4) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
5) औसा, (लातूर जिल्हा)
6) जिंतूर, (परभणी जिल्हा)
कोणत्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार आणि कोणत्या मतदारसंघातले उमेदवार पाडणाऱ्या बाबत मनोज जरांगे पाटील हे सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र त्यांच्या हिटलिस्टवर काही नेते मंडळी आहेत. ज्यांनी आधी मराठा आरक्षणाला विरोध केला होता किंवा तशा प्रकारची भूमिका घेतली होती. मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध केला होता, ज्यांनी तेव्हा त्रास दिला होता त्यांना पाडून त्यांचा बदला घ्यायचा, अशा भूमिकेत जरांगे आणि त्यांचे समर्थक आहेत.
कळमनुरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, औसामधून भाजप आमदार अभिमन्यू पवार, भोकरदनमधून माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे सध्या जरांगे यांचा टार्गेटवर असून यास नेत्यांना पाडण्यासाठी जरांगे पाटील उमेदवारांना आवाहन करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तर याबरोबरच बदनापूर राखीव जिल्हा जालना आणि पश्चिम विधानसभा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.