2019 ते 24 ही पाच वर्ष राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक घटनांनी भरलेली वर्ष होती या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राने अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी पहिल्या मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड असो व अजित पवारांनी महायुती सरकारला दिलेली साथ असो अशीच एक घटना पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात घडली होती ती अर्थातच पहाटेचा शपथविधी.
23 नोव्हेंबर 2019 ला राजभवनावर हा पहाटेचा शपथविधी पार पडला होता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी या दोन नेत्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. आज या घटनेला पाच वर्ष पूर्ण होत असताना आजच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत असल्याने या योगायोगाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नेमकं काय घडलं होतं?
आज महाराष्ट्राच्या लागणाऱ्या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले असून उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.परंतु आज असणाऱ्या 23 नोव्हेंबर या तारखेचा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नाट्यमय घडामोडीशी खूप मोठा संबंध आहे. याच दिवशी पाच वर्षांपूर्वी म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती या शपथविधीला पहाटेचा शपथविधी अशी ओळख आहे.