राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत चढली असून असून, सांगोला विधानसभा मतदारसंघातील सध्या राज्यभरात चर्चा आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात आजवर सोळा वेळा निवडणूक पार पडली असून ,त्यामध्ये तेरा वेळा धनगर समाजाचे तर तीन वेळा मराठा समाजाचे आमदार निवडून आले. त्यामुळे यंदा सांगोल्यात जात फॅक्टर प्रभावी ठरणार आहे.
यंदा सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून शहाजी बापू पाटील ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शेतकरी कामगार पक्षाकडून दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर 2019 मधील निवडणुकीत शहाजीबापू सोबत असलेले विधान परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक साळुंके पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली. त्यामुळे सांगोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
सांगोला मतदारसंघात मराठा समाजाचे मतदान 40% असल्याने ते कायम निर्णायक ठरतं आहे. तर उर्वरित 60 टक्क्यांमध्ये सर्वाधिक मतदान धनगर समाजाचा असून त्या पाठोपाठ लोणारी दलित मुस्लिम आणि लिंगायत जात समूहांचे मतदान आहे. कायम मराठेत्त्तर मतदार गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी उभा राहिल्याने त्या मतदारसंघातून सातत्याने विजयी झाले.काँग्रेसतर्फे १९५२ व १९५७मध्ये धनगर समाजाचे मेडशिंगीचे जो केशवराव राऊत पहिले आमदार ने झाले. त्यांनी शिंपी समाजाचे रावसाहेब पतंगे यांचा पराभव केला. त्यानंतर१९६२मध्ये काँग्रेसकडून पुन्हा राऊत विरुद्ध धनगर समाजातून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्यात सामना होऊन प्रथमच गणपतराव देशमुख विजयी झाले.त्यानंतर १९६७मध्ये देशमुख विरुद्ध काकासाहेब साळुंखे यांच्यात लढत होऊन देशमुख विजयी झाले. १९७२मध्ये साळुंखे यांच्याकडून देशमुख यांना पराभव पत्करावा लागला. १९७४मध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीत देशमुख विरुद्ध लिंगायत समाजाचे राजाभाऊ झपके यांच्यात लढत होऊन देशमुखांनी विधानसभेत पुनरागमन केले. त्यानंतर १९७८, १९८० व १९८५ आणि १९९० अशा सलग चार निवडणुका देशमुखांनी जिंकल्या.सन १९९५ मध्ये मात्र काँग्रेसकडून लढणारे शहाजीबापू पाटील केवळ १९२ मतांनी विजयी झाले. त्यानंतर पुन्हा १९९९, २००४, २००९ आणि २०१४मध्ये देशमुखांनाच सांगोल्याने पाठिंबा दिला. १९९०, १९९५ आणि २००४मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. गणपतराव मिसाळ व इतरांनी निवडणूक लढवली; परंतु ते पराभूत झाले. अनेकदा प्रयत्न करूनही विजय साध्य होत नसल्याने २००९ मध्ये भाजपने सांगोल्याची जागा शिवसेनेला देऊन त्याबदल्यात सांगली जिल्ह्यातील मिरजेची जागा आपल्याकडे घेतली. २०१९मध्ये मात्र वयोमानानुसार गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत युतीच्या शहाजीबापूंनी डॉ. देशमुख यांचा जेमतेम ७६८ मतांनी पराभव केला.
सांगोल्यात १९५२पासून २०२४पर्यंत झालेल्या निवडणुकीत पक्षीय विचारसरणीपेक्षा जातीच्या आधारेच निवडणूक झाल्याचे दिसते. यंदा होत असलेल्या सांगोल्यात होत असलेल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.