राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली असून राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
उद्या दुपारी एक वाजेपर्यंत तीन अधिकाऱ्यांची नावं पाठवा अशा सूचनाही केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्याचं पाहायला मिळत आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांवर अनेक आरोप करण्यात आले होते यामुळेच काँग्रेस पक्षाकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून बदली करावी असे मागणी केली होती