मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कुणाची? याची सध्या न्यायालयात लढाई सुरु आहे. शरद पवार गटाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार गटाला अडचणीत आणण्यासाठी ही मोठी खेळी समजली जात आहे. कारण, खोटी शपथपत्र सादर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
अजित पवार गटाकडून सुनावणी दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांची शपथपत्र सादर केली होती. पण यातील अनेक शपथपत्र ही खोटी असल्याचे समोर आलं होतं. या मुद्याला धरून शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शपथपत्रांचा मुद्दा सुनावणीत पुन्हा अधोरेखित करणार आहेत. जर खोटी शपथपत्रं दाखल करण्यात आली असतील तर त्या मुद्द्यावर सुनावणी घेण्याची मागणी करणार आहेत. खोटी शपथपत्रं दाखल करणं कलम 340 अन्वये गुन्हा असून निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अल्पवयीन लोकांच्या नावाने शपथ पत्र देणे हा मोठा गुन्हा आहे, कलम 340 अन्वये गुन्हा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात प्रथम अजित पवार गटाची याचिका रद्द करण्यात यावी असे पत्र, उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाच्या विविध निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे. जवळपास 8500 शपथपत्र खोटे आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत 4 हे अल्पवयीन शपथ पत्र आहेत, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Cucumber Benefits : हिवाळ्यात काकडी करेल तुमच्या त्वचेचे रक्षण
Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला
Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी