शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे

73 0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन थाटात साजरा

पुणे- आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन आगाशे बोलत होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा, अधिसभा सदस्य आणि सर्व अधिष्ठाता तसेच जीवनसाधना व युवा गौरव पुरस्काराचे मानकरी आदी मंचावर उपस्थित होते.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, मौखिक संवाद ते डिजिटल संवादाच्या प्रवासात लेखन परंपरा आली. मात्र ही लेखन परंपरा जोपासण्याच्या प्रयत्नात आपण चित्रसंवाद, ध्वनी संवाद, संवेदना दुसऱ्या भाषा मागे टाकल्या. मात्र औपचारिक शिक्षणात या सर्व भाषांचा समावेश होणे गरजेचे आहे.

डॉ.करमळकर म्हणाले, “जवळपास ५२ विभागांचा समावेश असणाऱ्या १७ प्रशाला विद्यापीठ परिसंस्थेत सुरू केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या विषयात अधिक अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विद्यापीठाने अनेक उपक्रम सुरू केले आहे. मागील पाच वर्षातील धोरणात्मक निर्णयाने विद्यापीठ भविष्यात मोठी उंची गाठेल” असा विश्वासही डॉ. करमळकर यांनी व्यक्त केला.

यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारती ठाकूर, आयुर्वेद विषयात काम असणारे डॉ. सदानंद सरदेशमुख, शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.मो.स.गोसावी, शैक्षणिक व सामाजिक कामात नावलौकिक मिळवलेले डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्योती देशमुख, सामाजिक व सहकार क्षेत्रातील रमेश आप्पा थोरात, विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील प्रमोद कांबळे, सांस्कृतिक व सांगीतिक क्षेत्रातील कलाकार व सुप्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख आदींना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तर विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या युवा गौरव पुरस्कारांमध्ये विनायक लष्कर यांना सामाजिक कार्यासाठी, लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांना साहित्य क्षेत्रातील, कला क्षेत्रात चिंतन उपाध्याय तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार टेनिसपटू अंकिता रैना यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले तर आभार डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले.

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

Posted by - April 28, 2022 0
पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
Jhimma 2 Trailer

Jhimma-2 movie reveiw : जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची गोष्ट; कसा आहे बहुचर्चित ‘झिम्मा 2’ चित्रपट

Posted by - November 24, 2023 0
2021 मध्ये कोविड काळात प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ ने प्रत्येकांच्या मनात एक नवीन उत्साह आणि आपुलकीचा भाव निर्माण केले होता. प्रत्येक…

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची निवड

Posted by - June 7, 2022 0
काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची…

जायकाच्या 550 कोटीच्या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार ? विवेक वेलणकर यांचा सवाल (व्हिडिओ)

Posted by - February 22, 2022 0
पुणे- पुणे शहरात निर्माण होणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी पुणे महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या…

पुणे : माजी सैनिक महिला बचत गटाला कल्याणकारी निधीतून अनुदान वाटप

Posted by - July 15, 2022 0
पुणे : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक महिला बचत गट उपक्रमाअंतर्गत पीएमपीएल प्रवासी वाहतूक बसेससाठी कल्याणकारी निधीतून शासनातर्फे मंजूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *