2021 मध्ये कोविड काळात प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ ने प्रत्येकांच्या मनात एक नवीन उत्साह आणि आपुलकीचा भाव निर्माण केले होता. प्रत्येक नायिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले होते. जे कुठल्याच हिंदी चित्रपटाना जमतं नव्हत ते एकट्या झिम्मा चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर करुन दाखवले होते. त्यामुळे नक्कीच दुसऱ्या भागाच्या घोषणेपासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढणे स्वाभाविकच होता. इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ आपल्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन आले.
पहिल्या भागात आपल्याला दिसले की नायिकांची फारशी ओळख आणि मैत्री नसून हळू हळू ती वाढते आणि त्या चांगल्या मैत्रिणी बनतात. ती नवीन मैत्री नंतर त्यांच्या नात्यात काय नवीन उतार चढाव येतात ते पाहण्याची उत्सुकता होती. या चित्रपटाच्या सिक्वल च्या निमिताने अपल्यर पुन्हा एकदा साथ नसून अजून दोघी नवीन पात्रं या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी एक निर्मलची सून तान्याचे (रिंकू राजगुरू) आणि दुसरी वैशालीची भाची मानली (शिवनी सुर्वे) इंदूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही सहल काढण्यात येते. यासाठी यूकेमध्ये लेक डिस्ट्रिक्ट ही जागा निवडण्यात येते. कृतिकाने (सायली संजीव) तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलंय आणि याठिकाणी ती दीर अलिस्टरसोबत बेड एंड ब्रेकफास्ट हॉटेल संभाळते. त्यानंतर सर्वांना इंदू वाढदिवस निमित्त सहलीला बोलवते.
या अनोख्या प्रवासात पुढे काय होते कोणकोणते किस्से घडतात, किती धम्माल होते हे पाहायला नक्की मिळणार आहे. या प्रवासात कबीर ( सिद्धार्थ चांदेकर) आपला वेगळेपण कसं दाखवून देतो ते पण दिसणार आहे. दुसऱ्या भागात सातही जनींच आपापल स्वतंत्र असतानाही सिद्धार्थने त्यांच स्वतंत्र जपत आपली भूमिका एकदम चोख साकारली आहे.चित्रपटात सात नायिका आणि एक नायक आहे बोलल्यावर समतोल साधण्याचं मोठे आव्हान लेखकासमोर असता. छोटे छोटे तुकडे एकत्र जोडावेत आणि त्याचा एक सुंदर चित्रं तयार करावा असा लेखकाचे प्रयत्न यशस्वी ठरले आहे. फक्त चित्रपटाच्या कथाच उत्तम नसून त्या कथेला योग्य न्याय देणारा दिग्दर्शकही महत्वाचा असतो.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला
Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी