मतदानानंतर अभिनेता शशांक केळकरने केली पोस्ट; सोशल मिडियावर तुफान चर्चा

599 0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया आज सकाळी झाली. यामध्ये सामान्य नागरिकांपासून राजकारणी आणि सेलिब्रिटींपर्यंत सर्व लोक मतदान करताना दिसले. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियावर मतदानाबद्दल पोस्ट शेअर करून इतरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यामध्ये अभिनेता शशांक केतकर याची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.

शशांक केतकर नेहमीच सोशल मीडियावर विविध सामाजिक मुद्द्यांवर आपले विचार मांडत असतो आणि राजकारणावरही त्याचे मत स्पष्टपणे व्यक्त करतो. आजच्या मतदानानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, “मी माझा हक्क बजावला आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. राजकारणाचा स्तर जरी घसरला असला तरी, उज्ज्वल भविष्याची आणि उत्तम हिंदुस्थानाची अपेक्षा आहे. मत देऊन गप्प बसू नका… चांगल्या कामाचं कौतुक करा आणि चुकांचा निषेध करा. इथून पुढे राज्यकर्त्यांचा नाही, तर आपला जनतेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असावा.”

त्याने फोटोवर एक मेसेजही दिला आहे, ज्यात तो म्हणतो, “राजकारण्यांसारखा प्रत्येकाकडे पैसा, गाड्या, मोठी घरं असावीत… पण भारताची लोकसंख्या पाहता, शुद्ध हवा, शांतता, स्वच्छ परिसर, पाणी, खड्डे नसलेले रस्ते, उत्तम शिक्षण, उत्तम इस्पितळं, बागा, सुरक्षित समाज, शून्य भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान हक्क, हाताला काम मिळावं… हे सर्व मिळवण्यासाठी प्रयत्न करा. 2025 लवकरच येणार आहे, निदान या साध्या गोष्टी तरी मिळू द्या.”

त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, आणि नेटकऱ्यांनी त्याच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे. शशांकच्या या विचारांवर सोशल मीडियावर चर्चाही सुरू आहे, आणि त्याच्या चाहत्यांनी त्याचे समर्थन केलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!