ए.आर. रेहमान आणि सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षानंतर घेतला विभक्त होण्याचा निर्णय

413 0

भारताचे प्रसिद्ध आणि ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या वकिलांनी यासंबंधी अधिकृत निवेदन जारी केले.

वकिल वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नात्यात आलेल्या भावनिक तणावामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.” यासोबतच खुद्द ए.आर. रेहमान यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाबाबत माहिती दिली.

आपल्या पोस्टमध्ये रेहमान म्हणाले, “आम्ही लग्नानंतर 30 वर्षे एकत्र साजरी करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट वेगळा असतो, हे स्वीकारणं कठीण आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या वेदनांमध्येही देवाचा आशिर्वाद असतो. या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर राखल्याबद्दल मित्रांचे आभार मानतो.” सायरा बानू यांनी याआधी दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, “बराच विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्यातील तणाव कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. हे नातं वाचवणं आता शक्य नाही.”

या निर्णयामुळे चाहत्यांमध्येही मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे.रेहमान आणि सायरा यांच्यातील हा निर्णय अनेकांना धक्का देणारा असला तरी त्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!