भारत पाकिस्तान या दोन देशातील लष्करी संघर्षाला दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMO) मध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर 5 वाजता युद्धविराम मिळाला. या दोन्हीं देशांच्या डीजीएमओमध्ये (DGMO) 12 तारखेला चर्चा होणार आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होऊ शकते पाहुयात.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या या भ्याड आल्यानंतर दहशतवादा विरोधात आणि पाकिस्तानी विरोधात भारतीयांच्या मनात मोठी चीड निर्माण झाली. त्यानंतर भारताने वॉटर स्ट्राइक करत पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाक व्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला.
या हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु भारताच्या लष्करानं तो परतवून लावला. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये मोठा लष्करी तणाव निर्माण झाला.
त्यानंतर दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओ ने भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेच्या प्रयत्ननंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शस्त्रसंधी अर्थात युद्धविराम झाला.त्यानुसारच भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये 12 मे रोजी चर्चा होणार आहे.
या चर्चेमध्ये भारत दहशतवाद हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्यावर चर्चा करणार आहे. तर भारत पाक मधील सिंधू पाणी करार स्थगित ठेवण्याची भूमिका भारताची असणार आहे. तर पाकिस्तानला सिंधू पाणी करार आणि काश्मीरच्या विषयावर चर्चा होईल अशी आशा आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसोबतचा भारताचा व्यापार हा स्थगित राहणार असल्याची भारताची भूमिका असण्याची शक्यता आहे तर पाकिस्तानला पुन्हा एकदा नव्याने भारतात सोबतची चर्चा असेल अशी आशा आहे.
तर दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय भारत कोणत्याही मुद्द्यावर पाकिस्तान सोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे तर भारतासोबत इतरही प्रश्न सुटतील अशी आशा पाकिस्तानला आहे. उद्या दोन्ही देशांच्या ’डीजीएमओ’ मध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.
cease fire: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा
Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY
HARSHWARDHAN PATIL BROTHER VIRAL VIDEO| हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाकडून डॉक्टरांना मारहाण