जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे, “पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी लोकांना खात्री देतो की या घृणास्पद हल्ल्यामागील लोकांना शिक्षा केली जाईल.
डीजीपी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकांनी परिसरात धाव घेतली आहे आणि शोध मोहीम सुरू केली आहे”.