मुंबई : राज्यातील तापमानात (Weather Update) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. उकाडा आणि उन्हाच्या कडाक्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणंही टाळत आहेत.दरम्यान आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
आज लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.