कोल्हापूर : कोल्हापुरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या उसाचे दर वाढून मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. शांततेत चाललेल्या या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. कर्नाटकाच्या सीमा भागातून आलेला उसाचा ट्रॅक्टर आंदोलकांकडून पेटवून देण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
सध्या ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरू आहे. मात्र हे आंदोलन आता चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील सीमा भागातून येणारा उसाचा ट्रॅक्टर पेटून देण्यात आला आहे. पेट्रोलचे गोळे टाकून ट्रॅक्टर पेटवण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर हेमरस सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. मात्र मध्येच हा ट्रॅक्टर पेटून देण्यात आला आहे.उसाच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रश्नावर अजूनही सरकारकडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार