महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. ही सभा प्रचंड चर्चेत असून त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अनेक संघटनांनी या सभेला विरोध दर्शवला आहे तर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे अवाहन राज्य सरकारने केले आहे. महाराष्ट्र दिनी औरंगाबद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत असलेल्या या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.