Pandharpur Wari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने महाराष्ट्रातील वातावरण भक्तीमय झालं. जेजुरी गडावर माऊलींच्या पालखीच मोठ्या जयघोषात स्वागत करण्यात आलं, तर दुसरीकडे काल यवत येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीला चांगलंच आदरातिथ्य लाभल्याचे पाहायला मिळाला..
YUVRAJ DHAMALE GROUP: युवराज ढमाले ग्रुप तर्फे दिंडी साठी वारकऱ्यांना 1000 रेन सूट्सचे वाटप
आज सकाळपासूनच जेजुरी नगरी भक्तीमय झाली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडहून मल्हारगडाच्या दिशेने (Pandharpur Wari) जेजुरीमध्ये दाखल झाली.लाखो वारकऱ्यांचा जयघोष, “माऊली माऊली”च्या गजरात जेजुरी गडावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतंय.
यावेळी खंडोबा देवाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली, मंदिर परिसरात विठ्ठलाची लक्षवेधक प्रतिकृती ठेवण्यात आली .माऊलींची पालखी जेजुरीत दाखल होताच, गडावर पवित्र भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. हा क्षण ‘याचि देही याचि डोळा’ असाच असाच होता..तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी सध्या यवत येथे मुक्कामी होती. येथे काळभैरवनाथ मंदिरात वारकऱ्यांच्या (Pandharpur Wari) वतीने पालखीच स्वागत करण्यात आलं.यवत ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी १ हजार किलो पिठलं आणि जवळपास १ लाख भाकऱ्यांची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे, सलीम शेख आणि अबरार शेख यांचे मुस्लिम कुटुंब गेली अनेक वर्षे अविरत वारकऱ्यांसाठी जेवण देत आहेत. त्यांच्या वडिलांनी फक्त १० भाकऱ्यांनी ही सेवा सुरू केली होती, आज ती एक अखंड परंपरा बनली आहे. आजचा संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम वरवंड येथील विठ्ठल मंदिरात होणार आहे.