नागपूर : विनयभंगाच्या गुन्हावर न्यायालयाने (Nagpur News) निकाल देताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि सायकल चालवताना ढकलणे हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही असं न्यायालयाने म्हंटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंगाच्या एका प्रकरणात निकाल देताना हे मोठे निरीक्षण नोंदवले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
वर्धेच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने एका तरुणाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. सायकल वरून जाताना एका तरुणाने पाठलाग केला, शिवीगाळ केली आणि ढकललं असल्याचं तिने तक्रारीदरम्यान म्हटलं होतं. आयपीसी 354 अंतर्गत वर्धा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा दिली होती. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे गेलं तेव्हा या प्रकरण काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली
आरोपीने विद्यार्थिनीला अयोग्यरित्या स्पर्श केला किंवा तिच्या शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला धक्का दिला, ज्यामुळे तिला लज्जा वाटली अशी तक्रारीत कुठेही नोंद नाही. सायकलवर असताना आरोपीने धक्का दिला,याला तक्रारदाराच्या शालीनतेला धक्का पोहचविणारे कृत्य म्हणता येणार नाही. “हे कृत्य आक्षेपार्ह किंवा त्रासदायक असू शकते,परंतु त्यामुळे महिलेचा विनयभंग झाला,महिलेच्या शालीनतेच्या भावनेला धक्का बसला असे म्हणता येणार नाही” असे न्यायालयाने म्हंटले आहे. यानंतर न्यायालयाने आरोपीची आयपीसी 354 च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार
Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले
Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण
Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा
Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?
Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू