सलग 5 वेळा आमदार ते मराठा समाजाचा बुलंद आवाज; कसा होता विनायक मेटे यांचा जीवनप्रवास

200 0

मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण आपघात झाला असून या अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली.

विनायक मेटे हे सामाजिक कामे आणि समाजाच्या लढ्यात नेहमी पुढे असायचे. याचे एक उत्तम उदाहण होते सामुदायिक विवाह सोळ्याची चळवळ उभारून स्वतः सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह केला होता.

सामुदायिक विवाह सोहळे घेण्यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. हजारो गोरगरीब कुटुंबातील युवक आणि युवतींचे त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह लावून दिले. हजारो संसार त्यांनी जोडले. विनायकराव मेटे हे जोडणारे होते. कायम त्यांनी माणसेच जोडली. सामाजिक लढे लढले, समाजासाठी संघर्ष केला. विनायकराव मेटे यांनी उभा केलेली सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ ही संसार जोडणारी आणि गोरगरीबांचे संसार जोडणारी चळवळ होती.

राजकीय कारकीर्द

१९९४ च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालिन युतीला पाठींबा दिला होता. सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांना धाडण्यात आले. त्यानंतर त्यांचे युतीशी बिनसले आणि त्यांचा महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादीत विलिन झाला. राष्ट्रवादीनेही त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली होती.

१९९५ सालापासून अपवाद वगळता विनायक मेटे विधानपरिषदेचे सदस्य राहिले आहे. २७ वर्षांच्या कार्यकाळात २५ वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली होती. मराठा महासंघाच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत उतरले. त्यानंतर सर्वप्रथम भाजप-युती सरकारच्या काळात ते आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.

२०१४साली त्यांनी शिवसंग्राम पक्ष महायुतीत विलीन केला. भाजपला पाठिंबा दिलेल्या मेटेना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. तसंच, पक्षांतर केल्यामुळं त्यांची आमदारकीची अर्धी टर्मही भाजपने त्यांना दिली. त्यानंतर पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाण्याची संधी भाजपने विनायक मेटे यांना दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!