छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारनं मराठा समाजासाठी (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. मात्र तरी देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि सगे सोयरे शब्दाची अंमबजावणी करावी या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारकडे एक नवी मागणी केली आहे.
काय केली मागणी?
राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे. अधिवेशनामध्ये एकमतानं दहा टक्के आरक्षणाला मंजुरी देण्यात आली, मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर ठाम आहेत. सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा एक नवी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, आम्ही दहा टक्के आरक्षण घेण्यास तयार आहोत, मात्र ते आरक्षण आम्हाला ओबीसीमधून द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘जे आरक्षण टिकणार नाही ते आरक्षण घ्या म्हणत आहेत. मात्र ओबीसीमधून आरक्षण ही आमची मुळ मागणी आहे. हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही. तुम्ही जर आम्हाला ओबीसीमधून दहा टक्के आरक्षण दिलं तर ते आम्ही स्विकारू’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर
Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?