जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने विशेष अधिवेशनात निर्णय घेऊन आरक्षण दिलं. तरी हे आरक्षण नको आहे सगेसोयरेची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उगारले आहे. हे आंदोलन नेमके कधी आणि कशाप्रकारे करण्यात येणार याची माहिती आज जरांगेनी दिली.
सरकारने दोन दिवसा सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आंदोनल कसं करायचं याचेही स्वरुप मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आपण फक्त गाव सांभाळायचे, कुणी तालुक्यात, जिल्ह्यात जाणार नाही. पूर्ण गाव आंदोलनात आले तर ताकद मिळेल. आंदोलन जेरीस आणण्यासाठी करायचं आहे. सगेसोयरे अंमलबजावणीसाठी आंदोलन करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
कसे करायचे आंदोलन?
आंदोलन सकाळी साडेदहा वाजता सुरू करायचं आहे. सर्व गावाने आंदोलन ठिकाणी यायचं. परवानगी जरी दिली नाही तरीही आंदोलन करायचं. एकानेच निवेदन द्यायचं. सर्वांनी जायचं नाही. कारण नोटीस एकालाच येईल. 24 तारखेला आंदोलन सुरू करायचे साडेदहा ते एक वाजे दरम्यान करायचे. ज्याला जमले नाही त्याने 4 ते 7 वाजता करायचे असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. रास्तारोको सुरु असताना परीक्षेला जाणारा कुणी आला तर त्याला त्याच्या शाळेत सोडून यायचं. गाडी फोडायची नाही, जाळपोळ करायची नाही. शांततेत हे रास्ता रोको असेल. हे आंदोलन 24 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येईल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग
Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त
Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी
Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन